Tuesday, March 2, 2021

जाणीव

उपरेपणाची जाणीव दिवसेंदिवस वाढत चाललीय बयो... आपल्या असण्याची, जगण्याची मुळं कुठेही रुजू नये असं कसं गं नशीब... जराही रेंगाळायला नको.. अडखळायला नको किंवा अगदी गुंतयलाही नको पाऊल कुठे असा गं कसा उफराटा प्रवास हा... भर मध्यान्हीचा प्रवास असावा हा. उगवतीचा अन मावळतीचा सूर्य अगदी समान अंतरावर... समान जागांवर.. दोन्हीकडे धरणीत रुजलेले .. मध्यान्ह पुन्हा उपरीच... सायं पहाटेच असणं जितकं हवसं तितकंच मध्यान्ह नकोशी..तरीही  मागे परतणं शक्य नाही अन् पुढे सरकणं अटळ.. तितकंच निर्विकार...नेमक्या  कुठल्याश्या निर्धाराने  मध्यान्हीचा प्रवास मावळतीला संपून पुन्हा पहाटेची रुजवात करतो  हे उलगडायला हवं बयो.. तिथेच कुठेतरी हे उपरेपणाचं कोडं उलगडेल...


कुठे रुजू नये मूळ, न कुठे फुलवा बहर
सरे कोडगा प्रवास जगण्याचा.

क्या करोगे?

गुज़र जाऊं इस पल में तो क्या करोगे? सच मानोगे इस बात को या झूठ कहोगे? सहम जाओगे? डर जाओगे? या रो पड़ोगे तुम? चिल्लाओगे? डांटोगे? या खफा हो ज...